🌻 धम्म परिषद आणि काही प्रश्न
धम्म परिषद कशासाठी? हा प्रश्न आपण अनेकदा ऐकत असतो.
गेल्या वीस वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रविवारी अकोला जिल्ह्यात भरतपूर, श्रावस्ती नगरी येथे असलेल्या तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळाच्या धम्म परिवेणात धम्म परिषद घेतल्या जातात. या धम्म परिषदेस पूज्य भदंत धम्मसेवकजी आणि पूज्य भदंत खेमधम्मोजी मुळावा यांच्या प्रेरणेचे अधिष्ठान आहे.
करुणा, प्रेम आणि बंधुभावाच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम आणि अढळ निष्ठा आवश्यक आहे.हे तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ
भरतपूरकरांनी जाणले आहे.दूरदूर पर्यंत ज्ञानासाठी भटकावे लागते.ते भटकतात.ज्ञानवंत शोधतात. त्यांना निमंत्रित करतात. ... इथे विपश्यनाचार्य युगाचारा अमेरिका यांनी धम्म देसना दिली. दार्जिलिंगचे खासदार भदंत धम्मविरियो यांनी चारिका केली. बुद्धाच्या अस्थी श्रीलंकेेवरून भदंत विशुद्धानंद औरंगाबाद यांनी आणल्या.इथे कोणत्याही खर्चाशिवाय विवाह करून दिल्या जातो.उत्तम व्यवस्थापन आणि भोजन व्यवस्था आहे.
सन २००४ पासून ही धम्म परिषद घेतल्या जाते. या आधी ३० श्रामणेर ३० गावांमधून ३० दिवस पायी चारीका करणे हा उपक्रम तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ भरतपूर हे राबवित असायचे.गावं आणि मनं एकमेकांना जोडले जात असायचे. जुळवन घट्टसर होईपर्यंत परिश्रम आणि परिश्रम.
मी तिथे राहायला असतांना २०१२ मध्ये धम्मकविसंमेलन घेतले होते. धम्मपरिषदेत घेतले जाणारे कविसंमेलन म्हणून धम्मकविसंमेलन.अध्यक्ष अ.भा. डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष मान.अशोक बुरबुरे सर. त्यात चित्रकार बळी खैरे, सुप्रसिद्ध आंबेडकरीकवि कार्यकर्ते आनंद गायकवाड, डॉ.चंद्रकांत सरदार, कविवर्य शशिकांत टेंभुर्णे, गझलकार विनोद बुरबुरे यांच्यासह डॉ.अशोक इंगळे,कवि आतीष डोंगरे, चित्रपट निर्माते किशोर अवचार,कवि राजेश डोंगरे,इ. प्रख्यात कविंनी आपली उपस्थिती लावली होती.त्यावेळी मान्यवर कवि आनंदराव गोठाकडे यांनी स्मृतीचिन्हांचे दान करून मला मदत केली होती.जाणुजी इंगळे यांनी कविंच्या भोजनाची व्यवस्था केली होती.महाराष्ट्रातील हे पहिलीच धम्मकविसंमेलन आहे.याची नोंद घ्यावी लागेल.
मी जेव्हा तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ भरतपूरकरांच्या संपर्कात आलो.तो धम्मचर्चांचा कालखंड होता, तेव्हापासून. रात्री बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातला एक विषय निवडून त्यावर विविध आंगोपांगांनी चर्चा होई....ती पहाटेच्या आल्हाददायक सूर्यप्रकाशात मिसळून जाई पर्यन्त.
कृषिनगरचे खंडारे,राहीत साहितचे वाहूरवाघ,वणी रंभापूरचे देवानंद वानखडे , देवळीचे सदांशीव हे गंभीर चर्चा करायचे. प्रश्न उपस्थित करायचे.घुसरचे कालकथीत तु.हि.गोपनारायण यांच गाणं 'गेली माय दलिंद्री गेली व,माया भीमानं ठोकत नेली वं...' मी अशाच एका धम्मचर्चेत ऐकलं होतं. त्यांना मार्ग गोपनारायण असे म्हणत असत. मध्यम शेगावकर गुरुजींचे ते सहकारी होते. मध्यम शेगावकर गुरुजी हे दीनबंधू शेगावकर गुरुजींचे बंधु.मध्यम गुरुजी यांनी तथागत सद्धम्म संदेश प्रचार मंडळ स्थापन केले.त्यांच्या शाखा अकोला, अमरावती, वाशिम, जिल्ह्यात आहेत. भरतपूर येथे प्रारंभिक शाखा आहे.या गावातून अनेक भिक्षू झाले.आज अध्यक्ष भास्करराव खंडारे यांच्यासह नाजूकराव खंडारे,जयसेन खंडारे,शत्रृघ्न खंडारे, ड्रायव्हर इंगळे, सुनील अंभोरे,प्रा.दिपक इंगोले, माझोड येथील सेवानिवृत्त कंडक्टर गोविंदराव खंडारे, श्रद्धाळू उपासक एका भिक्षूनीचे पिता आयु.प्रल्हाद जंजाळ आजही त्याच ऊर्जेने कार्य करतात. माझोडचे पत्रकार साहेबराव खंडारे, ढोरे,घोगरे ,गवई,सुरडकर, बोराडे ,सोळंके, पवार ,गायकवाड आणि भरतपूर येथील समस्त गावकरी जन आपल्या परिसरातल्या सगळ्या बांधवांना सोबत घेऊन एकात्मतेचे हे शिबीर चालवीत आहेत. ह्या गावात करुणेचा,शीलाचा जो प्रज्ञामय मृद्गंध आहे तो तीथेच निर्माण होतो. माझ्या माहितीत कालकथित भंतेजी धम्ममित्र, कालकथित पी. आर. खंडारे, जानराव गवई, महादेवराव खंडारे, भगवान खंडारे मिस्त्री, श्रीहरी जंजाळ,कवि एम.बी.खंडारे, माझोड येथील कुमार भाऊ खंडारे इ.कार्यकर्ते होते. (सर्वच नावे सविस्तरपणे लिहिताना देता येतील)
सध्या जे भिक्षू कार्यरत आहेत त्यात आर्याजी धम्ममेघा उ. प्र., पु. भंते श्रद्धानंद भरतपूर, भंते बी. बोधिशील औरंगाबाद, पू.भंते रठ्ठपाल,पु.भंते धम्मसागर खडकी अशा प्रकारे विविध ठिकाणी कार्यरत आहेत. आत्ताशा चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भंते बी. संघपालजी बुद्धभूमि शिर्ला आणि महान मैत्रीवान पु.भदन्त ज्ञानज्योतीजी,ताडोबा चंद्रपूर यांच्या प्रवचनानेच समारोप होतो.ज्ञानाच्या प्रकाशाची आभा दिवसेंदिवस गडद होत आहे.
या निमित्ताने जो प्रश्न निर्माण झाला तो चर्चेला घ्यायचा आहे.नाहीतर तो निसटून जाईल. त्यातून अनेक प्रश्नांची निर्मिती होते.ते म्हणजे...
स्वातंत्र्य म्हणजे काय?
मुक्तत्व म्हणजे काय?
हे मुख्य प्रश्न आज प्रामुख्याने उभे राहिले. प्रश्न निर्माण झाले की ; त्याची उत्तरे शोधणे आलेच. ते शोधता शोधता हे लक्षात आले की हे प्रश्न निर्माण होण्यामागे काही कारण आहे की मग त्यावर उत्तर हे आहेच हे आपल्याला दिसू लागते. हे तत्वच आहे प्रश्न मुक्तीच. आता,निर्माण करण्यात आलेल्या
या प्रश्नांमधून आपल्यासमोर जो उत्तरांचा सहसंबंध उभा राहतो , त्यातून एक निरामय विश्व निर्माण व्हावे. ही परिणती अपेक्षित असावी...या निरामय विश्वाचे काळाशी आणि स्थळाशी जे अमर्यादपण सांधले गेलेले आहे, त्याचाही विचार आपल्यासमोर येतोच येतो.
धम्मसंगितीं पासून तर धम्मपरिषदांमुळे स्थूल मानाने जे काय झालेले आहे, ते इतिहासातून चालत चालत आलेले आजच्या आपल्या काळापर्यंत आज रोजी आपल्याला दिसते आहे.आपण ते पाहत आलेले आहोत. किंबहुना हा जो काही शांततापूर्ण जीवनाचा ढाच्या आपल्यासमोर दिसतो आहे, त्याची जी काही अनेकविध प्रारूपे आपल्याला दृश्यमान झालेली अनुभवता येत आहेत त्यातूनच आजचे प्रासंगिक रचनाकार दृग्गोचर होत आहेत.हे सत्य आहे.आणि हेही सत्य आहे की ...तरीही त्या सर्वांचा जो आंतरिक भाव आहे तो त्या ,ज्यातून त्याचं येण यापूर्वीच आपण ठसठशीत केलं आहे तेही हेच आहे. तेच आहे स्वातंत्र्य....
मग हा युगसापेक्ष प्रश्न निर्माण होत आहे की मुक्तत्व आणि स्वातंत्र्य यामध्ये काही भिन्नत्व आहे का?स्वातंत्र्य हे स्वतःहून प्राप्त करता येतं का? की स्वातंत्र्य कुणाकडून घ्यावं लागतं? की स्वातंत्र्य कोणीतरी द्यावं लागतं ! की स्वातंत्र्य हे कुणीतरी देण्याची आणि कुणीतरी घेण्याची जी काही असेल ती प्रक्रिया आहे! स्वातंत्र्य हे वैयक्तिक असतं का? की ते समष्टी दर्शक आहे? स्वातंत्र्य हे किती कालावधीपर्यंत आपण घेऊ शकू? स्वातंत्र्याच्या काय मर्यादा असतात का? स्वातंत्र्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मुक्तत्वाला लागू पडतात का? की ते फक्त 'काय आहे ते' या अभिव्यक्तीस जीवंत ठेवणारे आहे? कुठून निर्माण होतो हा प्रश्न? मुक्तत्वाचा आणि समष्टीचा काही संबंध आहे का? समष्टीमध्ये मुक्तत्वाचा वावर होतो का? समष्टीमध्ये मुक्तत्व जन्म घेऊ शकत का? स्वातंत्र्यामध्ये मुक्तता असते का? मुक्ततेमध्ये स्वातंत्र्य असू शकते का? स्वातंत्र्य व्यापक आहे की मुक्तत्व व्यापक आहे? यापैकी जे व्यापक आहे असे आपण ठरवतो ते आपल्याला हवं आहे की जे व्यापकत्वाला कुंपण घालणाऱ्यांना अडवत नाही ते आपल्याला हवं आहे? हे ठरवणार् कोण? आपण आपल्याला जे काय हव आहे ते प्राप्त करण्याचा अधिकार आपणच आपल्याला देतो हा निसर्ग नियम बाजूला सारून जर आपल्याला जे हवे आहेत ते जर आपण पुन्हा अन्याकडून घेण्याची अपेक्षा करतो तर ते देणारा जो कोणी आहे, जी कोणती यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्या कोट्यातून ते आपल्याला देऊ केले तर ..! आणि आपण ते स्वीकारले तर ! किंवा स्वीकारायचे किंवा नाही स्वीकारायचे हा आपला स्वतःचा अधिकार आपण राखून ठेवायचा आहे की नाही , यावर आपण चर्चासत्रांचे आयोजन करू लागलो आहोत,असे सत्य दिसत असेल तर ! तर ,याला काय म्हणावे? असे खडसावल्यासारखे अनेकविध प्रश्न जेव्हा निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे सापडणे कठीण होते तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण कुठे जावे, असा प्रश्न ज्यांनी आपल्याला जे कोणते प्रश्न निर्माण होतील तेव्हा त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपण स्वतःच एक अत्यंत पूजनीय स्थान निर्माण करावे असे अध्यापन केलेले आहे ते आपल्याला समोरच दिसत आहेत,हे विसरता कामा नये.जे हे शिकले त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी तिथे जाता येते.तिथे जाता येण्यासाठी हवा असतो एक मार्ग. तो मार्ग त्या पूजनीय ठिकाणाहून शिकवण्यात आलेला आहेच. त्याच मार्गाने तिथपर्यंत जाता येते....आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेता येते.
त्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि एकमेव असा मार्ग आहे धम्मपरिषद.जिथे संगायन होते.त्याला संगिती असे देखील म्हणता येणार. संगिती मध्ये विचारांचे संगायन होते.ते गाथांचे संगायन आहे की सूत्रांचे संगायन.की विनयांचे संगायन! असा प्रश्न अशावेळी निर्माण होत नाही.....
संगिती मध्ये जेव्हा अनेकवीध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सगळे अर्हत एकत्र आलेले असतात तेव्हा त्यांच्यासमोर मुक्तते संबंधात कोणताही प्रश्न शिल्लक उरलेला नसतो, हे त्यांनाही माहित असते.त्यांना शिल्लक प्रश्न उरलेला नाही हे माहिती आहे. संगायन करणे ही वर्तमानीय वस्तूस्थितीला अनुसरून लोकाचारांचं अध्ययन करता येण्यासाठीची अत्यावश्यक घटना आहे हे ही माहित असते. या प्रसंगाला त्यांनीच निर्माण केलेले आहे. या घटनेच्या माध्यमातून त्यांनी ज्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबी आज रोजी हव्या आहेत त्या परिपूर्ण करता येतात.हे प्राप्त वस्तूस्थितीला अनुलक्षून असणाऱ्या समाजाला सांगणे, पटवणे, रुजवणे, बाणवणे त्यांचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे.हा प्रसंगाला ते प्राणापलीकडेही जपून त्याच्याच माध्यमातून त्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करतात. त्याचे प्रशिक्षणीय पैलू या माध्यमातून..समाजाला सांगता यावे.. याबाबतीतला वैज्ञानिक परामर्ष त्या ठिकाणी करतात.अशा प्रकारचं प्रशिक्षणच निर्माण करतात.संगितीत जेव्हा हे संगायन होते आणि त्याबाबतीत चर्चा होतात, विमर्ष होतात.. ते अनेक अंगाने होतात. त्या चर्चांचं सांगायन सुद्धा होणं आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे. तूर्त आपण एवढा जरी विचार करू शकलो की या संगायनाच्या दरम्यान अथवा जेव्हा हे संगायान होत नसतं अशावेळी हे अर्हत लोक आपापल्या ठिकाणी निघून जातात की आणखी काय करतात. तर अशावेळी ते जे काय करत असतात ते, समाजाच प्रतिबिंब असते असं म्हणण्या ऐवजी समाजामध्ये अशाच प्रकारची आचार प्रणाली रहावी हे स्वतःहून न सांगता आपल्या वर्तनातून ते दाखवून देत असतात. कोणी अशाप्रकारे वागतोय की नाही वागत याकडे त्यांचं लक्ष, जाणिव असते. त्यांचं लक्ष असं असतं की जो आदर्श आचार प्रणालीचा आयाम आहे त्याचा जन्मदाता अर्हत असल्यामुळे त्या अर्हतांमधूनच अशा प्रकारचा समाज जर निर्माण झाला तर तो समाज शिस्तप्रिय आणि मैत्रीकरुणाआनंदत्रयस्थ भाव एकत्रितपणे जाणणारा आणि त्याचा अनुभव करणारा असेल....हे संगितीच फलित आहे.ते बहूविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते..अशा ठराविक समूहाने पृथ्वीला तरुण ठेवले आहे.
अशा प्रकारे आजच्या आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला संगितींमधून येणारी अशा प्रकारची सूत्रे मांडता येतात. अशा प्रकारच्या सूत्रांमधूनच आपल्याला आदर्श समाजाची रचना करता येईल. आदर्श समाज रचनेचे आयाम मांडता येतील.ज्या प्रसंगाचा आधार घेऊन हा कार्यक्रम पृथ्वीभर राबवल्या जातो आहे ,त्याच प्रसंगातून अशा प्रकारच्या रचनेची जर निर्मिती झाली तर त्या समाजामध्ये जातीभेदाचे उच्चाटन होईल.
जेव्हा जातीभेदाचे उच्चाटन होते तेव्हा आदर्श समाजाची निर्मिती झालेली आहे असे समजले जाते. हीच आदर्श समाजाची आऊटलाईन आहे.
दिशांना पंख झटकून स्वतःच्या पलीकडे विस्तारीत नवा जन्म घेऊ पाहणाऱ्या अमर्याद विश्वाचा वेध घेता येऊ देतात हे तत्व.या तत्वांचा प्रसव या प्रसंगातून होतो हे माहिती असते.अविद्येतून जागे होण्याचे प्रसंग जन्माला येऊ लागतात.
🔅संजय प्रल्हादराव डोंगरे, अकोला
▫️९४२०७०४५८०
धम्म परिषद कशासाठी? हा प्रश्न आपण अनेकदा ऐकत असतो.
गेल्या वीस वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रविवारी अकोला जिल्ह्यात भरतपूर, श्रावस्ती नगरी येथे असलेल्या तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळाच्या धम्म परिवेणात धम्म परिषद घेतल्या जातात. या धम्म परिषदेस पूज्य भदंत धम्मसेवकजी आणि पूज्य भदंत खेमधम्मोजी मुळावा यांच्या प्रेरणेचे अधिष्ठान आहे.
करुणा, प्रेम आणि बंधुभावाच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम आणि अढळ निष्ठा आवश्यक आहे.हे तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ
भरतपूरकरांनी जाणले आहे.दूरदूर पर्यंत ज्ञानासाठी भटकावे लागते.ते भटकतात.ज्ञानवंत शोधतात. त्यांना निमंत्रित करतात. ... इथे विपश्यनाचार्य युगाचारा अमेरिका यांनी धम्म देसना दिली. दार्जिलिंगचे खासदार भदंत धम्मविरियो यांनी चारिका केली. बुद्धाच्या अस्थी श्रीलंकेेवरून भदंत विशुद्धानंद औरंगाबाद यांनी आणल्या.इथे कोणत्याही खर्चाशिवाय विवाह करून दिल्या जातो.उत्तम व्यवस्थापन आणि भोजन व्यवस्था आहे.
सन २००४ पासून ही धम्म परिषद घेतल्या जाते. या आधी ३० श्रामणेर ३० गावांमधून ३० दिवस पायी चारीका करणे हा उपक्रम तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ भरतपूर हे राबवित असायचे.गावं आणि मनं एकमेकांना जोडले जात असायचे. जुळवन घट्टसर होईपर्यंत परिश्रम आणि परिश्रम.
मी तिथे राहायला असतांना २०१२ मध्ये धम्मकविसंमेलन घेतले होते. धम्मपरिषदेत घेतले जाणारे कविसंमेलन म्हणून धम्मकविसंमेलन.अध्यक्ष अ.भा. डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष मान.अशोक बुरबुरे सर. त्यात चित्रकार बळी खैरे, सुप्रसिद्ध आंबेडकरीकवि कार्यकर्ते आनंद गायकवाड, डॉ.चंद्रकांत सरदार, कविवर्य शशिकांत टेंभुर्णे, गझलकार विनोद बुरबुरे यांच्यासह डॉ.अशोक इंगळे,कवि आतीष डोंगरे, चित्रपट निर्माते किशोर अवचार,कवि राजेश डोंगरे,इ. प्रख्यात कविंनी आपली उपस्थिती लावली होती.त्यावेळी मान्यवर कवि आनंदराव गोठाकडे यांनी स्मृतीचिन्हांचे दान करून मला मदत केली होती.जाणुजी इंगळे यांनी कविंच्या भोजनाची व्यवस्था केली होती.महाराष्ट्रातील हे पहिलीच धम्मकविसंमेलन आहे.याची नोंद घ्यावी लागेल.
मी जेव्हा तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ भरतपूरकरांच्या संपर्कात आलो.तो धम्मचर्चांचा कालखंड होता, तेव्हापासून. रात्री बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातला एक विषय निवडून त्यावर विविध आंगोपांगांनी चर्चा होई....ती पहाटेच्या आल्हाददायक सूर्यप्रकाशात मिसळून जाई पर्यन्त.
कृषिनगरचे खंडारे,राहीत साहितचे वाहूरवाघ,वणी रंभापूरचे देवानंद वानखडे , देवळीचे सदांशीव हे गंभीर चर्चा करायचे. प्रश्न उपस्थित करायचे.घुसरचे कालकथीत तु.हि.गोपनारायण यांच गाणं 'गेली माय दलिंद्री गेली व,माया भीमानं ठोकत नेली वं...' मी अशाच एका धम्मचर्चेत ऐकलं होतं. त्यांना मार्ग गोपनारायण असे म्हणत असत. मध्यम शेगावकर गुरुजींचे ते सहकारी होते. मध्यम शेगावकर गुरुजी हे दीनबंधू शेगावकर गुरुजींचे बंधु.मध्यम गुरुजी यांनी तथागत सद्धम्म संदेश प्रचार मंडळ स्थापन केले.त्यांच्या शाखा अकोला, अमरावती, वाशिम, जिल्ह्यात आहेत. भरतपूर येथे प्रारंभिक शाखा आहे.या गावातून अनेक भिक्षू झाले.आज अध्यक्ष भास्करराव खंडारे यांच्यासह नाजूकराव खंडारे,जयसेन खंडारे,शत्रृघ्न खंडारे, ड्रायव्हर इंगळे, सुनील अंभोरे,प्रा.दिपक इंगोले, माझोड येथील सेवानिवृत्त कंडक्टर गोविंदराव खंडारे, श्रद्धाळू उपासक एका भिक्षूनीचे पिता आयु.प्रल्हाद जंजाळ आजही त्याच ऊर्जेने कार्य करतात. माझोडचे पत्रकार साहेबराव खंडारे, ढोरे,घोगरे ,गवई,सुरडकर, बोराडे ,सोळंके, पवार ,गायकवाड आणि भरतपूर येथील समस्त गावकरी जन आपल्या परिसरातल्या सगळ्या बांधवांना सोबत घेऊन एकात्मतेचे हे शिबीर चालवीत आहेत. ह्या गावात करुणेचा,शीलाचा जो प्रज्ञामय मृद्गंध आहे तो तीथेच निर्माण होतो. माझ्या माहितीत कालकथित भंतेजी धम्ममित्र, कालकथित पी. आर. खंडारे, जानराव गवई, महादेवराव खंडारे, भगवान खंडारे मिस्त्री, श्रीहरी जंजाळ,कवि एम.बी.खंडारे, माझोड येथील कुमार भाऊ खंडारे इ.कार्यकर्ते होते. (सर्वच नावे सविस्तरपणे लिहिताना देता येतील)
सध्या जे भिक्षू कार्यरत आहेत त्यात आर्याजी धम्ममेघा उ. प्र., पु. भंते श्रद्धानंद भरतपूर, भंते बी. बोधिशील औरंगाबाद, पू.भंते रठ्ठपाल,पु.भंते धम्मसागर खडकी अशा प्रकारे विविध ठिकाणी कार्यरत आहेत. आत्ताशा चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भंते बी. संघपालजी बुद्धभूमि शिर्ला आणि महान मैत्रीवान पु.भदन्त ज्ञानज्योतीजी,ताडोबा चंद्रपूर यांच्या प्रवचनानेच समारोप होतो.ज्ञानाच्या प्रकाशाची आभा दिवसेंदिवस गडद होत आहे.
या निमित्ताने जो प्रश्न निर्माण झाला तो चर्चेला घ्यायचा आहे.नाहीतर तो निसटून जाईल. त्यातून अनेक प्रश्नांची निर्मिती होते.ते म्हणजे...
स्वातंत्र्य म्हणजे काय?
मुक्तत्व म्हणजे काय?
हे मुख्य प्रश्न आज प्रामुख्याने उभे राहिले. प्रश्न निर्माण झाले की ; त्याची उत्तरे शोधणे आलेच. ते शोधता शोधता हे लक्षात आले की हे प्रश्न निर्माण होण्यामागे काही कारण आहे की मग त्यावर उत्तर हे आहेच हे आपल्याला दिसू लागते. हे तत्वच आहे प्रश्न मुक्तीच. आता,निर्माण करण्यात आलेल्या
या प्रश्नांमधून आपल्यासमोर जो उत्तरांचा सहसंबंध उभा राहतो , त्यातून एक निरामय विश्व निर्माण व्हावे. ही परिणती अपेक्षित असावी...या निरामय विश्वाचे काळाशी आणि स्थळाशी जे अमर्यादपण सांधले गेलेले आहे, त्याचाही विचार आपल्यासमोर येतोच येतो.
धम्मसंगितीं पासून तर धम्मपरिषदांमुळे स्थूल मानाने जे काय झालेले आहे, ते इतिहासातून चालत चालत आलेले आजच्या आपल्या काळापर्यंत आज रोजी आपल्याला दिसते आहे.आपण ते पाहत आलेले आहोत. किंबहुना हा जो काही शांततापूर्ण जीवनाचा ढाच्या आपल्यासमोर दिसतो आहे, त्याची जी काही अनेकविध प्रारूपे आपल्याला दृश्यमान झालेली अनुभवता येत आहेत त्यातूनच आजचे प्रासंगिक रचनाकार दृग्गोचर होत आहेत.हे सत्य आहे.आणि हेही सत्य आहे की ...तरीही त्या सर्वांचा जो आंतरिक भाव आहे तो त्या ,ज्यातून त्याचं येण यापूर्वीच आपण ठसठशीत केलं आहे तेही हेच आहे. तेच आहे स्वातंत्र्य....
मग हा युगसापेक्ष प्रश्न निर्माण होत आहे की मुक्तत्व आणि स्वातंत्र्य यामध्ये काही भिन्नत्व आहे का?स्वातंत्र्य हे स्वतःहून प्राप्त करता येतं का? की स्वातंत्र्य कुणाकडून घ्यावं लागतं? की स्वातंत्र्य कोणीतरी द्यावं लागतं ! की स्वातंत्र्य हे कुणीतरी देण्याची आणि कुणीतरी घेण्याची जी काही असेल ती प्रक्रिया आहे! स्वातंत्र्य हे वैयक्तिक असतं का? की ते समष्टी दर्शक आहे? स्वातंत्र्य हे किती कालावधीपर्यंत आपण घेऊ शकू? स्वातंत्र्याच्या काय मर्यादा असतात का? स्वातंत्र्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मुक्तत्वाला लागू पडतात का? की ते फक्त 'काय आहे ते' या अभिव्यक्तीस जीवंत ठेवणारे आहे? कुठून निर्माण होतो हा प्रश्न? मुक्तत्वाचा आणि समष्टीचा काही संबंध आहे का? समष्टीमध्ये मुक्तत्वाचा वावर होतो का? समष्टीमध्ये मुक्तत्व जन्म घेऊ शकत का? स्वातंत्र्यामध्ये मुक्तता असते का? मुक्ततेमध्ये स्वातंत्र्य असू शकते का? स्वातंत्र्य व्यापक आहे की मुक्तत्व व्यापक आहे? यापैकी जे व्यापक आहे असे आपण ठरवतो ते आपल्याला हवं आहे की जे व्यापकत्वाला कुंपण घालणाऱ्यांना अडवत नाही ते आपल्याला हवं आहे? हे ठरवणार् कोण? आपण आपल्याला जे काय हव आहे ते प्राप्त करण्याचा अधिकार आपणच आपल्याला देतो हा निसर्ग नियम बाजूला सारून जर आपल्याला जे हवे आहेत ते जर आपण पुन्हा अन्याकडून घेण्याची अपेक्षा करतो तर ते देणारा जो कोणी आहे, जी कोणती यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्या कोट्यातून ते आपल्याला देऊ केले तर ..! आणि आपण ते स्वीकारले तर ! किंवा स्वीकारायचे किंवा नाही स्वीकारायचे हा आपला स्वतःचा अधिकार आपण राखून ठेवायचा आहे की नाही , यावर आपण चर्चासत्रांचे आयोजन करू लागलो आहोत,असे सत्य दिसत असेल तर ! तर ,याला काय म्हणावे? असे खडसावल्यासारखे अनेकविध प्रश्न जेव्हा निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे सापडणे कठीण होते तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण कुठे जावे, असा प्रश्न ज्यांनी आपल्याला जे कोणते प्रश्न निर्माण होतील तेव्हा त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपण स्वतःच एक अत्यंत पूजनीय स्थान निर्माण करावे असे अध्यापन केलेले आहे ते आपल्याला समोरच दिसत आहेत,हे विसरता कामा नये.जे हे शिकले त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी तिथे जाता येते.तिथे जाता येण्यासाठी हवा असतो एक मार्ग. तो मार्ग त्या पूजनीय ठिकाणाहून शिकवण्यात आलेला आहेच. त्याच मार्गाने तिथपर्यंत जाता येते....आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेता येते.
त्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि एकमेव असा मार्ग आहे धम्मपरिषद.जिथे संगायन होते.त्याला संगिती असे देखील म्हणता येणार. संगिती मध्ये विचारांचे संगायन होते.ते गाथांचे संगायन आहे की सूत्रांचे संगायन.की विनयांचे संगायन! असा प्रश्न अशावेळी निर्माण होत नाही.....
संगिती मध्ये जेव्हा अनेकवीध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सगळे अर्हत एकत्र आलेले असतात तेव्हा त्यांच्यासमोर मुक्तते संबंधात कोणताही प्रश्न शिल्लक उरलेला नसतो, हे त्यांनाही माहित असते.त्यांना शिल्लक प्रश्न उरलेला नाही हे माहिती आहे. संगायन करणे ही वर्तमानीय वस्तूस्थितीला अनुसरून लोकाचारांचं अध्ययन करता येण्यासाठीची अत्यावश्यक घटना आहे हे ही माहित असते. या प्रसंगाला त्यांनीच निर्माण केलेले आहे. या घटनेच्या माध्यमातून त्यांनी ज्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबी आज रोजी हव्या आहेत त्या परिपूर्ण करता येतात.हे प्राप्त वस्तूस्थितीला अनुलक्षून असणाऱ्या समाजाला सांगणे, पटवणे, रुजवणे, बाणवणे त्यांचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे.हा प्रसंगाला ते प्राणापलीकडेही जपून त्याच्याच माध्यमातून त्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करतात. त्याचे प्रशिक्षणीय पैलू या माध्यमातून..समाजाला सांगता यावे.. याबाबतीतला वैज्ञानिक परामर्ष त्या ठिकाणी करतात.अशा प्रकारचं प्रशिक्षणच निर्माण करतात.संगितीत जेव्हा हे संगायन होते आणि त्याबाबतीत चर्चा होतात, विमर्ष होतात.. ते अनेक अंगाने होतात. त्या चर्चांचं सांगायन सुद्धा होणं आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे. तूर्त आपण एवढा जरी विचार करू शकलो की या संगायनाच्या दरम्यान अथवा जेव्हा हे संगायान होत नसतं अशावेळी हे अर्हत लोक आपापल्या ठिकाणी निघून जातात की आणखी काय करतात. तर अशावेळी ते जे काय करत असतात ते, समाजाच प्रतिबिंब असते असं म्हणण्या ऐवजी समाजामध्ये अशाच प्रकारची आचार प्रणाली रहावी हे स्वतःहून न सांगता आपल्या वर्तनातून ते दाखवून देत असतात. कोणी अशाप्रकारे वागतोय की नाही वागत याकडे त्यांचं लक्ष, जाणिव असते. त्यांचं लक्ष असं असतं की जो आदर्श आचार प्रणालीचा आयाम आहे त्याचा जन्मदाता अर्हत असल्यामुळे त्या अर्हतांमधूनच अशा प्रकारचा समाज जर निर्माण झाला तर तो समाज शिस्तप्रिय आणि मैत्रीकरुणाआनंदत्रयस्थ भाव एकत्रितपणे जाणणारा आणि त्याचा अनुभव करणारा असेल....हे संगितीच फलित आहे.ते बहूविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते..अशा ठराविक समूहाने पृथ्वीला तरुण ठेवले आहे.
अशा प्रकारे आजच्या आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला संगितींमधून येणारी अशा प्रकारची सूत्रे मांडता येतात. अशा प्रकारच्या सूत्रांमधूनच आपल्याला आदर्श समाजाची रचना करता येईल. आदर्श समाज रचनेचे आयाम मांडता येतील.ज्या प्रसंगाचा आधार घेऊन हा कार्यक्रम पृथ्वीभर राबवल्या जातो आहे ,त्याच प्रसंगातून अशा प्रकारच्या रचनेची जर निर्मिती झाली तर त्या समाजामध्ये जातीभेदाचे उच्चाटन होईल.
जेव्हा जातीभेदाचे उच्चाटन होते तेव्हा आदर्श समाजाची निर्मिती झालेली आहे असे समजले जाते. हीच आदर्श समाजाची आऊटलाईन आहे.
दिशांना पंख झटकून स्वतःच्या पलीकडे विस्तारीत नवा जन्म घेऊ पाहणाऱ्या अमर्याद विश्वाचा वेध घेता येऊ देतात हे तत्व.या तत्वांचा प्रसव या प्रसंगातून होतो हे माहिती असते.अविद्येतून जागे होण्याचे प्रसंग जन्माला येऊ लागतात.
🔅संजय प्रल्हादराव डोंगरे, अकोला
▫️९४२०७०४५८०
No comments:
Post a Comment