Sunday, February 10, 2019

प्रवर्तन

प्रवर्तन


मानवी सभ्यतेचे पुनर्स्थापन  चार पायाभूत तत्वांवर करावे लागणार आहे.
मानवी सभ्यतेच्या पुनर्स्थापनेचे आवश्यकता आहे का? हा प्रश्न देखील अत्यंत महत्वाचा मानला गेले पाहिजे.
आवश्यकतांचे चिन्हांकन करता यायला पाहिजे त्याशिवाय त्यावर रुकार दर्शक जनमानस मान्यत्वाला पोचणार नाही.

पृथ्वीच्या बाहेर उभे राहून पृथ्वीशी वागल्यासारखा हे वागण, तुम्ही हर्क्युलस झाला आहेत. ज्या वाहनावर ते बसले आहेत त्याचे इंधन संपणारच आहे.
बुद्ध,कबीर,फुले,शाहू,आंबेडकर हे काय लोक होते की काय, की जे मानवतावाद मांडत आलेत.
कुठेतरी आपली गफलत होते आहे हे समजून घेतले पाहिजे.

तंत्रज्ञान आणि जैवशास्त्र यांच्या शिवाय सगळं शून्य आहे. म्हणून एक सिद्धांत घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल.
१.संविधान (Constituent)श्रद्धा
२.मृत्यूभय त्याग
३.दुःखाचा स्वीकार
४.सापेक्षतेचा अंगीकार

या चार पायाभूत तत्वांवर आधारित हा प्रवर्तनाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत घेऊनच पुढे जाता येईल. त्याच्याशिवाय लोकशाही टिकणार नाही. लोकशाही टिकली नाही. आपले जगणे मुश्किल होईल.
याविषयी आणखी काही सांगणे आवश्यक नाही.

                                   ◆संजयप्रडोंगरे


सहवास